Mazi Prakashan Parikrama
Click Image for Gallery
अभिनव प्रकाशन'ची स्थापना १९४४ सालची. म्हणजे स्वातंत्र्यचळवळीच्या
अखेरच्या टप्प्यात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आलेली उमेद न गमावता, त्या
स्वातंत्र्याचा गरीब, उपेक्षित कष्टकरी जनतेला कसा लाभ घेता येईल, याचा
विचार करून जे चळवळीत राहिले, त्यांपैकी वा. वि. भट एक. स्वातंत्र्यानंतर
भटांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत झोकून दिले. अमर शेख, गवाणकर,
अण्णाभाऊ साठे यांच्याबरोबर ते महाराष्ट्रभर फड गाजवत असत. चळवळीमुळे
लोकांच्या ओठांवर आलेली गाणी भट छापून आणत. त्यांच्या आनंदी असण्याचे
आणि अथकपणे काम करीत राहण्याचे रहस्य त्यांच्या चळवळ्या वृत्तीत होते.
कुमार केतकर
Mazi Prakashan Parikrama | Va. Vi. Bhat
माझी प्रकाशन परिक्रमा । वा. वि.भट
