Raw & India's Most Fearless
Raw
ही आहे रॉची कहाणी.
बांगलादेश मुक्तीयुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील
दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून
उरण्याची... रॉ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची.
पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या
कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय
घडामोडीमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरून चालत
असते ते. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या
राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा.
तेथे नैतिक-अनैतिकतेचे निकष फोल असतात. तेथे असते ते केवळ
स्वराष्ट्राचे हित.
भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे
एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या
मोहिमांच्या या कथा आपणांस दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या
गूढ अंतरंगाचे.
आज, आपल्या नजिकच्या भूतकाळाबद्दल नाहक शंका उपस्थित केल्या जात असताना, गेल्या पन्नास-साठ-सत्तर वर्षांत आपण काय केले असे न्यूनगंड निर्माण करणारे सवाल केले जात असताना, येता-जाता इस्रायलच्या ‘मोसाद’चे उदाहरण देत आपल्या देशाच्या तथाकथित दौर्बल्याचा प्रचार केला जात असताना, रॉचा हा पडद्याआडचा इतिहास जाणून घेणे अत्यावश्यक आहे. एका सशक्त सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून ते आपले कर्तव्यच आहे.
रॉ भारतीय गुप्तचार्संस्थेची गुढगाथा - रवि आमले
India's Most Fearless
भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा
एल.ओ.सी.च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये
पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे
नेतृत्व करणारे मेजर, 11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक,
कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणार्या भूमीवरून शेकडो लोकांची
सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर
जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही
जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट!
ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणार्या घटनांचं हे कथन!
काही त्यात प्रत्यक्ष सहभागी असणार्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित,
तर काही त्यांच्याबरोबरच्या मोहिमेत त्यांना अखेरपर्यंत साथ देणार्या
इतरांनी सांगितलेल्या माहितीवर आधारलेल्या, अशा ह्या कथा!
‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ हे पुस्तक असामान्य शौर्य आणि
कमालीची निर्भयता, ह्यांचं दर्शन वाचकांना घडवतं.
अत्यंत विपरीत परिस्थितीत आणि गंभीर आव्हानं समोर असतानाही,
भारताच्या ह्या शूरवीरांनी ज्या धाडसाने त्यांच्यावर मात केली आहे,
त्याच्या खिळवून ठेवणार्या हकिगती लेखकांनी
ह्यात पुस्तकातून वाचकांपुढे ठेवल्या आहेत.
India's Most Fearless - Shiv Aroor, Rahul Singh
इंडियाज मोस्ट फिअरलेस - शिव अरूर, राहुल सिंग